Niymit Partfed Karjmafi Yojana 2022!!! 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान फक्त या शेतकऱ्यांना जाहीर पहा लगेच कोणाला मिळणार अनुदान…

 Niymit Partfed Karjmafi Yojana : सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्यातील नियमित परतफेड करणारे शेतकरी आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांना मोठ्या दिलाचा निर्णय राज्य सरकारने दिलेला आहे. तर या नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रु. प्रोत्साहन देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. आणि यासाठी एकूण किती शेतकरी पात्र आहेत. कोणत्या वर्षासाठी म्हणजेच कोणत्या वर्षी नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. याची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तर या विषयी सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. 

Niymit Partfed Karjmafi Yojana



Niymit Partfed Karjmafi Yojana

              यंदाचा राज्य अर्थसंकल्प सादर करताना. अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजना सुरू केलेल्या आहेत. त्यांनी यात महत्त्वाची योजना म्हणजेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान ही आहे. तर यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना आता नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणजे 50 हजार प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. यासाठी पात्रता, अटी, शर्ती, काय आहेत या बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. तर सर्वप्रथम 20 लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत तर यांना 10 हजार कोटी रुपये एवढे या नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. 


कोणाला मिळणार 50 हजार रुपये प्रोत्साहन

                  50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान हे फक्त या तीन वर्षातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. म्हणजेच या तीन वर्षात नियमित परतफेड केलेली शेतकरी या 50000 प्रोत्साहन अनुदान योजनेसाठी पात्र असणार आहे. कोणत्या वर्षी आहे आणि यामध्ये किती शेतकऱ्याला लाभ दिला जाणार याची माहिती समोर बघू. महात्मा फुले कर्ज माफी योजने अंतर्गत नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रउपये प्रोत्साहन देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. परंतु या कोरोनाच्या कालावधीमध्ये योजनेला स्थगिती देण्यात आलेली होती.


50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान 2022 

                 राज्याची परिस्थिती रुळावर आल्यानंतर आता 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान लाभार्थी पात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आपण पाहिलं तर एकूण जिल्हा बँकेचे 35 हजार 879 तर राष्ट्रकृत बँकेचे जवळपास 19 हजार शेतकरी पात्र ठरविण्यात आले आहेत. यामध्ये राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आता शेतकरी बांधवांना शेती कर्ज घेण्यासाठी तीन लाख (Niymit Partfed Karjmafi Yojana) रुपयांपर्यंतचे कर्ज पुरवठा केला जात आहे.


कोण आहेत पात्र कोणाला मिळेल 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान 

                   यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही महत्त्वाची माहिती दिली आहे. तरी यामध्ये नियमित परतफेड केलेले शेतकरी पुढील वर्षीप्रमाणे पात्र असतील. जसे 2017-18, 2018-19, 2019-20 या तीन वर्षातील शेतकऱ्यांना नियमित परतफेड केली आहे. अशाच शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. 2017 ते 2020 यामधील नियमित परतफेड केलेले जे शेतकरी आहेत. अशी नियमित कर्जदार यांची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सादर करण्यात आली आहे. पाहिले तर 20 लाख शेतकऱ्यांना या 50 हजार अनुदानाचा लाभ मिळणार आहे. आणि यासाठी 10 हजार कोटी रुपये कर्जमाफी योजनेत 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.



Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!