Shivaji Maharaj Yojana 2022 त्यावेळेस असा प्रश्न विचारला गेला की जे थकीत कर्ज त्यांना सरकार प्रोत्साहन देते आणि सरकार कर्जमाफ करते. नियमित कर्ज फेडणारे दरवर्षी अकाउंट रिन्यू करतात त्यांचे काय चुकले. त्यावर असा तोडगा काढला की जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये योग्य अनुदान देण्याचे घोषित करण्यात आले. परंतु 2017 ला ही घोषणा झाली 2022 ला याची अंमलबजावणी करण्याचा मानस ठरला आता 2023 आहे.
- अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपये अनुदान आणखीन प्राप्त झाले नाही.
- सरकार कडून वेळोवेळी सांगण्यात आलं की 2020 कोरोना संकटामुळे सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे त्यामुळे अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही.
- परंतु 2022-23 मध्ये परत सरकारकडने घोषित करण्यात आल्या जीआरएस निघाले की आता 50 हजाराचा प्रोत्साहन अनुदान वाटप करण्यात येईल.
- साधारणता आकडा जर काढण्यात आला तर महाराष्ट्र राज्यात नियमित कर्ज फेडणारे शेतकरी केसीसी धारक असतील त्याची संख्या 30 लाखाच्या आसपास जात होती.
- त्यासाठी लागणारे अनुदान 10 ते 15 लाख करोड पर्यंतच हे अनुदान लागण्याची शक्यता वर्तवली गेली.
- बँकेकडे याद्या मागविण्यात आल्या यात असे लक्षात आले की बँकेच्या याद्या मार्फत 18 ते 20 लाख केसीसी धारक आहेत जे की ह्या अनुदासाठी पात्र आहेत.
- त्यासाठी नऊ ते दहा लाख कोटीचा निधी हा लागणार होता.
- योजनेची पहिली यादी जाहीर झाली त्यानंतर शेतकऱ्यांना केवायसी करण्यात आवश्यक होते.
- महात्मा फुले कर्जमाफी योजना या पोर्टल वर जाऊन आधार कार्ड क्रमांक प्रवेश करून केवायसी करणे गरजेचे आहे.
- ह्याची पुष्टी, मान्यता देण्याचे गरजेचे होते
- त्या आदेशानुसार शेतकऱ्याने केवायसी करण्यास गर्दी केली आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसीही केली आहे.
- केवायसी करूनही सर्व शेतकऱ्यांच्या केवायसीखात्यावर पैसे पोहोचले नाही.

Shivaji Maharaj Yojana 2022
- सरकार मार्फत आता असे सांगण्यात आले की 4700 कोटीचा निधी हा वाटप करण्यात आलेला आहे.
- परंतु जर शेतकऱ्यांचा डेटा बगितला तर केवळ 20 ते 30% शेतकऱ्यांना ज्यांनी केवायसी केलेली आहेत अश्या शेतकऱ्यांना फक्त अनुदान प्राप्त झाले.
- आणखीनही पहिल्या यादीतले 70 टक्के शेतकरी प्रतेक्षित आहेत.
- त्यानंतर दुसरी यादी प्रकाशित करण्यात आले.
- दुसरी यादी प्रकाशित करण्याचा उद्देश तिजोरी वर भार न पडावा आणि दोन ते तीन टप्प्यात या योजनेचे अंमलबजावणी किंवा त्या पैशाचे वाटप करण्यात यावे म्हणून तीन ते चार याद्या प्रकाशित करण्याचा निर्णय झाला होता.
- दुसरी यादी प्रकाशित झाली शेतकऱ्यांनी केंद्रावर जाऊन केवायसी केले परंतु आणखीनही त्यांच्याही खात्यावर पैसे जमा झालेले नाही.
- त्यानंतर तिसरी यादी प्रकाशित झाली काही शेतकरी प्रतेक्षित आहे ते नियमित कर्जदार असूनही दुसऱ्या, तिसऱ्या, चौथेही यादीत नाव येत नाहीये.
- या सर्वांमध्ये शेतकऱ्याचा गोंधळ उडालेला आहे.
- केंद्रावर जातात आणि आधार कार्ड देऊन यादीत नाव आहे का हे तपासून घेतात.
- झाल्यानंतर तिथे सांगण्यात येते की यादीत नाव नसेल तर तुम्ही बँकेत चौकशी करा.
- बँकेत गेल्यानंतर त्यांच्याकडे उत्तर एकच येते की निकषानुसार तुम्ही पात्र नाहीयेत किंवा तुमचे नाव आम्ही सरकारकडे पाठवलेले आहेत परंतु यादीत नाव येत नाही.
- शेतकरी कृषी विभागाला भेट देतात सरकारी कर्मचाऱ्यांना भेट देतात परंतु त्यांच्या करून अद्याप काही आलेले नाही.
- त्यातच नवीन मानस हा काढलेला आहे की डीबीटी मार्फत पैसा वाटप केला जाणार आहे.

बियाणे अनुदान अर्जासाठी शेवटची तारीख
डीबीटी म्हणजे काय?
- Shivaji Maharaj Yojana 2022 डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच तुमच्या खात्यावर सरकारी अनुदान किंवा योजनेतून तुम्हाला जर पैसे मिळवायचे आहे. त्यासाठी प्रत्येक वेळी बँकेचा खाते आयएफसी कोड देऊन नोंदणी करायची आवश्यकता नाहीये.
- डीबीटीच्या अंतर्गत ज्या खात्याला शेवटचं आधार कार्ड लिंक असेल त्या खात्यावर ऑटोमॅटिकली पैसे जमा होणार आहे.
- काही शेतकऱ्यांनी नोंदणीच्या काळात बचत खाता दिलेला आहे आणि दोन-तीन वर्षानंतर त्या खात्यावर व्यवहारच नाही.
- किंवा कुठल्या कारणाने ते खाते बंद पडला असेल आणि अनुदान जर त्या खात्यावर येणार असेल तर ते खाते अनुदान बाऊन्स होतील.
- या डीबीटी वापर करण्याचा मानस हा केवायसी करल्यानंतर पैसे पडण्याची सोय ही या कर्जमाफी प्रोत्साहन पर यादीमध्ये करण्यात आली.
Pingback: Shivaji Maharaj Yojana :५००००/- अनुदान कधी? - Indien Farmer